नवी दिल्ली: भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या सुटकेची मागणी जोर धरत आहे. इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इस्लामचे कार्यकर्ते आणि समर्थक खान यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सोडण्यासाठी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारवर दबाव वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान भीतीच्या छायेत आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता इम्रान खान यांची सुटका आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
असीम मुनीर यांच्या राजीनाम्याची मागणी -
दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक मोहीम सुरू केली आहे. समर्थकांची मागणी आहे की, खान यांना तुरुंगातून सोडण्यात यावे. इम्रानचे समर्थक असेही म्हणत आहेत की पहलगाम हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रचला होता. त्यामुळे आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी सोशल मीडियावरही जोर धरत आहे.
इम्रान खानच्या सुटकेची मागणी -
तथापि, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर खानच्या सुटकेची मागणी करणारे अनेक हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. #ReleaseKhanForPakistan आणि #FreeImranKhan हे हॅशटॅग्ज वापरून अनेक पोस्ट करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थरकाप! 1 हजाराहून अधिक मदरसे केले बंद
इम्रानच्या समर्थकांचा असीम मुनीर यांच्यावर आरोप -
इम्रान खान यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. त्यांचे समर्थक त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. इम्रानच्या समर्थकांचा आरोप आहे की, भारतातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रचला होता. सोशल मीडियावर #ResignAsimMunir हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
हेही वाचा - पाकिस्तानकडून सलग सातव्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; नियंत्रण रेषेवर केला गोळीबार
जगभरातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध -
पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर टीका होत आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशियासह अनेक देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या देशांनी म्हटले आहे की ते भारतासोबत खंबीरपणे उभे राहतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी अण्वस्त्रधारी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच सुरक्षा परिषदेची बैठक होऊ शकते.