Saturday, May 10, 2025 12:12:04 AM

संदीप देशपांडेची अजित पवारांवर टीका

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी भाजपसोबत लग्नगाठ बांधली- संदीप देशपांडे

संदीप देशपांडेची अजित पवारांवर टीका

महाराष्ट्र: महाराष्ट्रात राजकीय वातावरण नेहमीच तापलेलं असत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. अनेक राजकीय नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात. अशातच आता मनसेचे संदीप देशपांडे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका होती. त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केलीय. काय म्हणाले संदीप देशपांडे पाहुयात: 

हेही वाचा: मुंबई लाईफलाईनचं रूप बदलणार

काय म्हणाले संदीप देशपांडे? 

अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली. राज ठाकरेंच्या जीवावर आम्हाला मतं मिळाली आहेत. भाजपचा पदर पकडला म्हणून मतं मिळाली नाहीत. अजित पवारांनी स्वता:च्या जीवावर उभं राहावं मग वल्गना कराव्यात असा बोचरा वार संदीप देशपांडे यांनी केला. अजित पवार यांची पत्नी आणि मुलगा जिंकून आले नाहीत. पण, भाजपसोबत लग्नगाठ बांधली आणि यश मिळवले. अजित पवार यांनी स्वबळावर लढून दाखवावे असे आवाहनही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले.

हेही वाचा:  राजन साळवींचा ठाकरेंना राम राम?

काय म्हणाले होते अजित पवार? 

काही दिवसांपूर्वी मनसेच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निकांलांबदद्ल आश्चर्य व्यक्त केले होते. निकाल अनाकलनीय असल्याचं म्हणताना त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून येण्यावर त्यांनी शंका उपस्थित केली होती. राज ठाकरेंच्या याच शंकेला अजित पवारांनी तोडीसतोड उत्तर दिले. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो, असे अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते.


boost the morale of indian forces prakash ambedkar appeals to activists
माझा वाढदिवस साजरा करू नका त्याऐवजी भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवा; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Ishwari Kuge

माझा वाढदिवस साजरा करू नका त्याऐवजी भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवा प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

शुभम उमले, प्रतिनिधी, मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना केक न कापण्याचे, फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: 'आमचा पंतप्रधान डरपोक आहे' पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद खटक यांची शरीफ यांना चपराक

त्याऐवजी, भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि पाकिस्तानच्या गोळीबारात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे तसेच राज्यात 'तिरंगा रॅली' काढण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 'या 'तिरंगा रॅली'चा मुख्य उद्देश भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवणे आहे', असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यादरम्यान, 'तिरंगा रॅली'मध्ये 'भारत झिंदाबाद' अशा घोषणा देण्याची सूचना त्यांनी दिली आहे.

हेही वाचा: 'महिलांच्या सैन्य भरतीचा प्रस्ताव मी ठेवला होता'; शरद पवारांनी सांगितला संरक्षण मंत्री असतानाचा किस्सा

10 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला जातो. राज्यभरात हा दिवस 'स्वाभिमान दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदा भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय भारतीय सैन्य आणि शहीद जवानांविषयी असलेल्या आदराचे आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.