Saturday, May 10, 2025 05:46:13 AM

विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच; अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.

विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा होता. जिल्हा नियोजन समितीची बैठक आटपून त्यांनी विविध प्रश्नांसाठी प्रशासकीय बैठकही घेतली. यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

'विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच'

बीड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. बीड आवादा कंपनीचे खंडणी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यावर बोलताना विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच असा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

हेही वाचा : प्रवासी विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकले

चुकीचं वागलं तर कार्यवाही होणारच

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणाच वाल्मिक कराड पोलिस कोठडीत आहे. कराड हा धनंजय मुंडेचा माणूस आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचाही हात असल्याच्या टीका वारंवार धस, क्षीससागर यांच्याकडून केल्या जात आहेत. तसेच मंत्री मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असंही त्यांच्याकडून बोलले जात आहे. यावर अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली होती. जर धनंजय मुंडे या प्रकरणात सापडले तरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पवारांनी सांगितले होती. आज बीड दौऱ्यावेळी मी तुमच्या जवळचा असेल तरीही चुकीचं वागू नका. चुकीचं वागलं तर कार्यवाही होणारच असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा : महाकुंभात इंटरनेटवर व्हायरल होणारी मोनालिसा चित्रपटात भूमिका साकारणार

अजित पवारांनी काय सूचना केल्यात?

विकासाची कामं करताना खंडणी मागू नका. काम करताना जातपात पाळणारा माणूस नाही. जिल्ह्यात दर्जेदार काम झालंच पाहिजे. गैरव्यवहार आढळले तर थेट मकोकाच लागणार आहे. वेडंवाकडं काम सहन करणार नाही. बीडच्या पहिल्याच बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांनी  पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. बीडचा पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा आलोय. पराभव झाला तरी खचू नका. तथ्य असल्यास कारवाई होणारच असा थेट इशारा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी दिला.

 

 

 


boost the morale of indian forces prakash ambedkar appeals to activists
माझा वाढदिवस साजरा करू नका त्याऐवजी भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवा; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Ishwari Kuge

माझा वाढदिवस साजरा करू नका त्याऐवजी भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवा प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

शुभम उमले, प्रतिनिधी, मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना केक न कापण्याचे, फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: 'आमचा पंतप्रधान डरपोक आहे' पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद खटक यांची शरीफ यांना चपराक

त्याऐवजी, भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि पाकिस्तानच्या गोळीबारात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे तसेच राज्यात 'तिरंगा रॅली' काढण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 'या 'तिरंगा रॅली'चा मुख्य उद्देश भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवणे आहे', असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यादरम्यान, 'तिरंगा रॅली'मध्ये 'भारत झिंदाबाद' अशा घोषणा देण्याची सूचना त्यांनी दिली आहे.

हेही वाचा: 'महिलांच्या सैन्य भरतीचा प्रस्ताव मी ठेवला होता'; शरद पवारांनी सांगितला संरक्षण मंत्री असतानाचा किस्सा

10 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला जातो. राज्यभरात हा दिवस 'स्वाभिमान दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदा भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय भारतीय सैन्य आणि शहीद जवानांविषयी असलेल्या आदराचे आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.