Pakistan cyber attack On India प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारत या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार करत आहे. परंतु, पाकिस्तान अजूनही आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीये. दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान आता भारतातील अनेक संस्थांवर सायबर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न करत आहे.
हेही वाचा - सरकारनं पीओके ताब्यात घ्यावं; असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल
'या' सायबर गटांकडून भारतावर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न -
पाकिस्तान प्रायोजित 'सायबर ग्रुप HOAX1337' आणि 'नॅशनल सायबर क्रू' सारख्या हॅकर गटांनी गुरुवारी काही वेबसाइट्समध्ये घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या सायबर सुरक्षा एजन्सींनी हे हॅकिंग प्रयत्न तातडीने ओळखले आणि ते वेळेत निष्क्रिय केले.
हेही वाचा - गंगा एक्सप्रेस - वेवर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं; पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायूदल सज्ज
आर्मी पब्लिक स्कूलला करण्यात आले लक्ष्य -
पाकिस्तानी सायबर गुन्हेगारांनी जम्मूमधील आर्मी पब्लिक स्कूल नागरोटा आणि सुंजवानच्या वेबसाइट्सना लक्ष्य केले. ज्यामध्ये त्यांची खिल्ली उडवणारे संदेश देण्यात आले होते. दुसऱ्या एका घटनेत, सायबर गुन्हेगारांनी माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवा देणाऱ्या वेबसाइट नष्ट करण्याचा प्रय्तन केला. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची वेबसाइट आणि भारतीय हवाई दलाच्या माजी सैनिकांच्या वेबसाइट हॅक करून डिजिटल युद्धभूमीत तणाव निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यावरून स्पष्टेपणे दिसून येत आहे.