Thursday, May 22, 2025 06:16:22 PM

मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही; ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर पार पडले. यावेळी ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले.

मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा

नाशिक : नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर पार पडले. यावेळी ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 


उद्धव ठाकरे यांनी निर्धार शिबिरातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिवसभर आज निर्धार शिबीर सुरू आहे. यावेळी तुमचे आशीर्वाद सत्तेपेक्षा जास्त आहेत. सत्ता नसताना तुम्ही माझ्यासोबत आहात. उन्हामुळे सगळेच गरम होतात मात्र विचाराने गरम झाले पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 250 पेक्षा जास्त जण मरण पावले आहेत. आज मुंबई लुटली जात आहे. सगळं गुजरातला जात आहे. सगळ्या गुजरातींवर माझा राग नाही फक्त दोन जणांवर आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. नेहरूंना पण महाराष्ट्रात बंद गाडीतून फिरावं लागलं. अमित शहा यांनी शिवाजी महाराज यांच एकेरी उल्लेख केला. कोणीही अपमान केला तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असेही उद्धव यांनी म्हटले आहे. 

'भाजपाला सोडलंय, हिंदुत्वला नाही'
भाजपाने 32 लाख कुटुंबीयांना सौगात पाठवली. सौगात वाटताना देशप्रेमी मुसलमानांना कसं ओळखलं? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे. तसेच भाजपाला सोडलंय, हिंदुत्वला नाही. भाजपाकडून हिंदूंना घंटा आणि मुस्लिमांना सौगात अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी  भाजपावर केली आहे. मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही असे ठामपणे त्यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा : नागपुरात काँग्रेसची सद्भावना यात्रा; प्रदेशाध्यक्ष सपकाळांची सरकारवर जोरदार टीका

'राज्यपाल भवनाच्या जागी शिवस्मारक करा'
पुढे बोलताना, काँग्रेसच्या वतीने बोलायला इथे आलेलो नाही. मोदी म्हणतात काँग्रेसने मुस्लिम नेता काँग्रेस अध्यक्ष करून दाखवावा. मग तुम्ही दलित व्यक्ती सरसंघचालक करून दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मोदींना केले. अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक कधी होणार आहे. अरबी समुद्रात जर स्मारक होत नसेल तर राज्यपाल भवन येथे करा. राज्यपाल भवन दुसरीकडे शिफ्ट करून तिथे शिवाजी महाराज यांचं स्मारक करा अशी मागणी उद्धव यांनी केली आहे. तसेच तुम्ही तिथे स्मारक करा आमचा देखील पाठिंबा तुम्हाला राहील अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. 

'मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले तरी नाशिकला अजून पालकमंत्री का नाही?'
लोकसभेला तुम्ही राजाभाऊ यांना निवडून दिला. विधानसभेला देखील सगळ्या सभांना गर्दी होती. बॅग तापसणारे अधिकारीदेखील मला तुम्ही निवडून येणार सांगत होते. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. मग नाशिकला अजून पालकमंत्री का नाही असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. 100 स्मार्ट सिटी देशात उभे करणार होते. त्यात नाशिकदेखील एक शहर होते. आता ती योजना गुंडाळली पण काम काहीच नाही. 

'शिवसैनिक नसते तर अयोध्येत मंदिर झालं असतं का?' 
सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार होते, लाडकी बहिणींना 1500 वरून 2100 देणार होते. मात्र दिले नाहीत. देणार नव्हते तर मग लाडक्या बहिणींना का फसवलं असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. आम्ही शेती करु किंवा कर्ज काढून लग्न लावून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे म्हणत माणिकराव कोकाटेंवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही अयोध्येत मंदिर बांधले. पण शिवसैनिक नसते तर ते झालं असतं का? आम्ही देखील रामाची पूजा करतो असे यावेळी ठाकरे यांनी म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री