मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरीतील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: मी दोषी असेल तर मला फासावर लटकवा; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
''आपल्या महा महिला आयोगचा कारभार हा असा आहे 'वराती मागनं घोडं'. बरं बाईंचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत! कालपरवा मा. छगन भुजबळ साहेबांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असताना बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या. समोर मीडिया होती पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की दाल में कुछ काला है ! ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेले प्रतिक्रिया आहे का? हा प्रश्न आमच्या मनात आहे. वैष्णवीची केस ही पुण्याची आहे, पुण्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. हगवणे हा अजित दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजित दादांनी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीही या हगवणेची हकालपट्टी केल्याबाबतची नोटीस काढायला हवी होती. पण अजूनही त्याची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या चित्रा वाघ ही या प्रकरणात गप्प आहेत. या अर्थ असा की सत्तेतील सर्वच लोक 'आपला' म्हणून हगवणेला वाचवत आहे. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे''.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट; फरार सासरा आणि दीर अटकेत