Friday, May 16, 2025 01:08:34 PM

डरपोक पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती; पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र

पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र सुरु आहे. पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरलचे एक पत्र सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

डरपोक पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र सुरु आहे. पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरलचे एक पत्र सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. त्या जनरल लेफ्टनंटने राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डरपोक पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती असल्याचे दिसून येत आहे. 

भारताच्या भीतीने पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र सुरु आहे. पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरल ओमर अहमद बोखारी यांनी जनरल असीम मुनीरांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली असून पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. लीक झालेल्या पत्रांमुळे पाकिस्तानी सैन्यात वाढलेली खळबळ उघडकीस आली आहे.

हेही वाचा : बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी
पाकिस्तानात राजीनाम्यांचे सत्र

1. XII कॉर्प्स (क्वेटा):

राजीनाम्यांची संख्या: 120 अधिकारी आणि 400 नोंदणीकृत कर्मचारी

प्रभावित युनिट्स: पश्चिम सीमेवर तैनात इन्फंट्री रेजिमेंट्स .

2. फोर्स कमांड नॉर्दर्न एरियाज (FCNA):

राजीनाम्यांची संख्या: 80 अधिकारी आणि 300 नोंदणीकृत कर्मचारी

प्रभावित युनिट्स: माउंटन बटालियन्सना उत्तरेकडील गंभीर क्षेत्रांचे रक्षण करण्याचे काम दिले जाते.

3. आय कॉर्प्स (मंगला):

राजीनाम्यांची संख्या: 50 अधिकारी आणि 500 ​​नोंदणीकृत कर्मचारी

प्रभावित युनिट्स: यंत्रीकृत पायदळ आणि तोफखाना रेजिमेंट मुख्य फॉरवर्ड पोझिशनवर तैनात आहेत.

एकूण राजीनामे: 250 अधिकारी आणि 1,200 नोंदणीकृत कर्मचारी

भारताच्या भीतीने पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरल ओमर अहमद बोखारी यांनी जनरल असीम मुनीरांना पत्र लिहले. लेफ्टनंट जनरल ओमर अहमद बोखारी लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. हे पत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे. लीक झालेल्या पत्रांमुळे पाकिस्तानी सैन्यात वाढलेली खळबळ उघडकीस आली आहे. 

भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान 250 हून अधिक अधिकारी आणि 1200 सैनिकांचा राजीनामा समावेश आहे. अंतर्गत पत्रात नैतिक पतनाची चिंता लेफ्टनंट जनरल बोखारी यांनी व्यक्त केली. राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून प्रामुख्याने कौटुंबिक दबाव, मानसिक थकवा आणि भारतासोबतच्या वाढत्या तणावादरम्यान धोरणात्मक निर्देशांबाबत अनिश्चिततेचा उल्लेख पाहायला मिळाला. मनोबलावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी त्वरित हस्तक्षेपाची मागणी पत्रात करण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री