नवी दिल्ली: भारतीय सैन्यदलाने नुकतेच ‘ऑपरेशन सिंदूर’ या गुप्त हवाई मोहिमेची अधिकृत माहिती जाहीर केली असून, या कारवाईत भारतीय वायुदलाने अवघ्या 23 मिनिटांत पाकिस्तानातील 11 महत्त्वाचे एअरबेस बेचिराख केले. विशेष म्हणजे या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही, ही बाब अत्यंत समाधानकारक आणि अभिमानास्पद आहे.
ही कारवाई पाकिस्तानच्या सीमेवर सुरू असलेल्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी करण्यात आली होती. या मोहिमेच्या वेळी पाकिस्तानमध्ये तैनात असलेली चिनी बनावटीची आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमदेखील निष्प्रभ ठरली. संपूर्ण कारवाईदरम्यान ही सिस्टीम जवळपास 23 मिनिटांपर्यंत ‘जॅम’ करण्यात आली होती, ज्यामुळे भारतीय विमानांना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
हेही वाचा: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने Amazon, Flipkart, Etsy आणि इतर कंपन्यांना नोटीस बजावली
‘ऑपरेशन सिंदूर’ ही अतिशय काळजीपूर्वक आखलेली आणि यशस्वी पार पडलेली कारवाई ठरली आहे. भारतीय सैन्यदलांच्या योजनाबद्ध हालचाली, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि अत्यंत जलद निर्णयक्षमतेमुळे हे यश शक्य झाले. या कारवाईने केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर त्या देशात तैनात असलेल्या चिनी उपकरणांनाही मोठा धक्का दिला आहे.
भारतीय सैन्यदलाच्या या पराक्रमामुळे देशवासीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती अधिकृतपणे जाहीर करताना म्हटले की, ही केवळ एक नमुना कारवाई होती आणि भारत शांततेचा पुरस्कार करत असला तरी देशाच्या सुरक्षेला कुणीही आव्हान दिल्यास कठोर उत्तर देण्यास सक्षम आहे.
या कारवाईत वापरले गेलेले तंत्रज्ञान, सुस्पष्ट माहितीवर आधारित टार्गेटिंग आणि अचूक वेळी केलेली कारवाई यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या लष्करी क्षमतेची दखल घेतली जात आहे. देशाच्या हवाई सुरक्षेसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात असून भारतीय लष्कराचा हा पराक्रम देशाच्या शौर्यगाथेत सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
'ऑपरेशन सिंदूर' हे फक्त एक सैनिकी ऑपरेशन नव्हते, तर ते भारतीय सामर्थ्य, नियोजन आणि राष्ट्ररक्षणाच्या निर्धाराचे प्रतीक ठरले आहे.