Sunday, July 13, 2025 10:12:09 AM

वारीतल्या अर्बन नक्षलवादावर राजकीय मंडळींची प्रतिक्रिया

वारीतील अर्बन नक्षलवादावर आता राजकीय नेत्यांदेखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वारीमध्ये अर्बन नक्षलवाद शिरला आहे. घुसखोरी करणाऱ्यांना शिक्षा करणार असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

वारीतल्या अर्बन नक्षलवादावर राजकीय मंडळींची प्रतिक्रिया

मुंबई: पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीत वैचारिक नक्षलवादी (अर्बन नक्षल) शिरले आहेत. हो लोक वारीत घुसून बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली होती. समस्त वारकरी संस्था आणि संस्थान यांच्यावतीने काही दिवसांपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत तात्यांनी ही मागणी केली होती. यावर आता राजकीय नेत्यांदेखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

वारीतला अर्बन नक्षलवाद रोखायला हवा अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली आहे. वारीमध्ये अर्बन नक्षलवाद शिरला आहे. घुसखोरी करणाऱ्यांना शिक्षा करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर संविधानाला अर्बन नक्षलवाद समजणं ही वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे. 

हेही वाचा: Amarnath Yatra 2025: जुलैमध्ये 'या' तारखेला अमरनाथ यात्रा सुरू होईल

अर्बन नक्क्षलवाद म्हणजे नेमकं काय? 
अर्बन नक्क्षलवाद असलेल्या शहरी भागातील लोकांचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. हे लोक नक्षलवाद्यांना उघडपणे 
किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात. त्यांच्या विचारधारेचा प्रसार करतात किंवा त्यांच्या कार्यांना मदत करतात. 'शहरी माओवादी' म्हणजे जे थेट हिंसेत सामील नाहीत पण ज्यांचा वैचारिक दृष्ट्या भांडवलशाहीला पूर्ण विरोध आहे. भारतीय राज्यसंस्था लोकविरोधी आहे असं ज्यांना वाटतं असे लेखक, कलावंत, बुद्धिवंत इत्यादी आहेत. 

वारीत अर्बन नक्षली? 
वारीत देवाला न मानणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झाला आहे. संविधान दिंडी,पर्यावरण वारी, लोकायत या नावांचा वापर केला जात आहे. वारीत पथनाट्य, भाषणं दिली जात आहेत. लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठी विधेयक आणले जाणार आहे. 


सम्बन्धित सामग्री