Saturday, August 16, 2025 08:29:36 PM

११ वाजेपर्यंत एवढ्या टक्के मतदान

११ वाजेपर्यंत एवढ्या टक्के मतदान  

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्यासह देशात लोकसभा निवडणुक चालु आहे. राज्यात शुक्रवारी सकाळपासून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात आठ मतदारसंघात मतदान पार पडताना दिसत आहे.  नागरिक सकाळपासून मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत बुलढाणा मतदारसंघात १७.९२ टक्के, अकोला १७.३७ टक्के, अमरावती १७.७३ टक्के , वर्धा - १८.३५ टक्के , यवतमाळ-वाशिम - १८.०१ टक्के ,  हिंगोली - १८.१९ टक्के ,  नांदेड - २०.८५ टक्के , परभणी - २१.७७ टक्के  मतदान झाले आहे.


सम्बन्धित सामग्री