Friday, May 16, 2025 02:22:54 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीची छाया.. हे ट्रेंडस् आणि कीवर्डस सर्वाधिक गुगल सर्च

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात प्रचंड संताप आहे. दहशतवाद पोसणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं भारतानं स्पष्ट सुनावलंय. आता पाकिस्तानी लोक काय गुगल सर्च करत आहेत, जाणून घेऊ..

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीची छाया हे ट्रेंडस् आणि कीवर्डस सर्वाधिक गुगल सर्च

pahalgam terror attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये प्रचंड संताप तर, पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण, जो कोणी दहशतवादाला आश्रय देईल, त्याला त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे लागेल, असे भारताने स्पष्टपणे सुनावले आहे. अशा परिस्थितीत, लोक आता पाकिस्तानकडून हल्ल्याच्या शक्यतेबद्दल गुगलवर खूप शोधत आहेत.

कोणत्याही देशात इंटरनेटवर सर्वात जास्त काय ट्रेंडिंग आहे, हे जाणून घेण्यासाठी लोक गुगल ट्रेंड्सचा (Google Trends in Pakistan) वापर करतात. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे प्रमुख आधीच धास्तावले आहेत. अशा परिस्थितीत, या घटनेनंतर, तेथील लोकांनी त्यांच्या देशाच्या सुरक्षेबद्दल गुगलवर सर्च करायला सुरुवात केली आहे. ते अशा गोष्टी शोधत आहेत, ज्याच्यावरून त्यांच्या देशावर हल्ल्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा - ..सगळ्या पाकिस्तान्यांची वृत्ती अशीच! 'मला सचिनला मुद्दाम दुखापत करायची होती,' शोएब अख्तरने स्वतःच सांगितलं

पाकिस्तानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, काही पाकिस्तानी भारत हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त करत आहेत. तर, बरेच लोक गुगलवर भारताचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना शोधत आहेत. इंटरनेटवरील काही वापरकर्त्यांनी पाकिस्तानच्या गुगल सर्चचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहलगाम हल्ल्याबाबत केलेला शोध वरच्या क्रमांकावर आहे.
गुगल ट्रेंड्समध्ये ही गोष्ट आढळली.

गेल्या 24 तासांत पाकिस्तानमध्ये शोधल्या गेलेल्या गोष्टींमध्ये 'पहलगाम' तिसऱ्या स्थानावर असल्याचे गुगल ट्रेंड्समध्ये दिसून येते. यावरून असा अंदाज येतो की, या हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईबद्दल पाकिस्तानी लोक चिंतेत आहेत. तर, काही विघ्नसंतोषी लोकांना याबद्दल आसुरी आनंदही वाटू शकतो. पण युद्धाची काळजी तिथल्या लोकांपेक्षा तिथल्या सैन्याला आणि राज्यकर्त्यांना कितीतरी पटीने जास्त वाटत असेल.

हेही वाचा - भारताच्या कठोर भूमिकेवर पाकिस्तानी युजरची पोस्ट; '..तुम्ही काय पाणी थांबवणार? इथे आधीपासूनच येत नाही!'

या मुद्द्यावर पाकिस्तान तयार आहे
याशिवाय, भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीही X वर लिहिले की, 'मला विश्वास आहे की, पाकिस्तान भारताच्या कोणत्याही हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. वृत्तानुसार, पहलगाममधील हल्ला 4 दहशतवाद्यांनी केला होता, त्यापैकी 2 पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात आहे.

#PahalgamTerroristAttack (पहलगाम दहशतवादी हल्ला)
या हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानी सोशल मीडियावरही दिसून येत आहे, जिथे #PahalgamTerroristAttack पासून #Modi पर्यंतचे हॅशटॅग जोरदार ट्रेंड करत आहेत. अनेक पाकिस्तानी लोकांनी त्यांच्या पोस्टमध्ये अशी भीती व्यक्त केली आहे की, पंतप्रधान मोदी पाकिस्तानवर मोठा हल्ला करू शकतात.

ट्रेंडनुसार, पाकिस्तानमध्ये काश्मीर, मोदी, पुलवामा आणि जम्मू सारखे (Kashmir, Modi, Pulwama, Jammu) कीवर्ड देखील खूप शोधले गेले आहेत. जे दोन्ही देशांमधील नवीनतम परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. हा उपद्व्याप करण्यापूर्वी पाकिस्तानने विचार केलेला नाही. मात्र, त्यानंतर आता पाकिस्तानही आतल्या आत चिंतित झाला आहे.

सर्च केलेले कीवर्ड्स
पाकिस्तानात सध्या ‘pahalgam attack, kashmir, kashmir attack india, pahalgam attack updates, india attack, pahalgam terror attack, pahalgam incident india news, what happened in pahalgam today, pahalgam kashmir, connection pak army’ असे कीवर्ड सर्च केले जात आहेत.


सम्बन्धित सामग्री