Saturday, May 17, 2025 09:07:12 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय वस्तू पाकिस्तानात जातायत; कंपन्यांनी शोधल्या पळवाटा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय कंपन्या त्यांची उत्पादने पाकिस्तानला पाठवत आहेत. दोन्ही देशांमधील थेट व्यापारावर बंदी असल्याने कंपन्यांनी नवीन पळवाटा शोधून काढल्या आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय वस्तू पाकिस्तानात जातायत कंपन्यांनी शोधल्या पळवाटा

नवी दिल्ली: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी अनेक कडक पावले उचलली आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारही जवळजवळ थांबला आहे. त्याच वेळी, आकडेवारीवरून असे दिसून येत आहे की, दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय वस्तू पाकिस्तानात विक्रीसाठी जात आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय कंपन्या त्यांची उत्पादने पाकिस्तानला पाठवत आहेत. भारत आणि पाकिस्तान दोन देशांमधील थेट व्यापारावर (Trade Between India and Pakistan) बंदी असल्याने या कंपन्यांना एक नवीन मार्ग सापडला आहे. या भारतीय कंपन्या पाकिस्तानमध्ये माल विकण्यासाठी इतर देशांच्या बंदरांचा वापर करत आहेत.

हेही वाचा - शिमला करार मोडला तर फायदा कुणाला? भारताला PoK परत घेण्याची संधी मिळेल?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) नुसार, भारतातून पाकिस्तानला तिसऱ्या मार्गाने 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा माल पाठवला जातो. जीटीआरआयने म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांनी भारतातून पाकिस्तानला माल पाठवण्यासाठी दुबई, सिंगापूर आणि कोलंबो या बंदरांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. व्यापारावरील बंदी टाळण्यासाठी ते हे करत आहेत.

अहवालात काय आहे?
जीटीआरआयच्या अहवालात असे म्हटले आहे की व्यापारातील अडथळे असूनही भारतीय माल या मार्गांनी पाकिस्तानात पोहोचत आहे. अहवालात म्हटले आहे की, 'जीटीआरआयचा अंदाज आहे की, भारत दरवर्षी या मार्गाने पाकिस्तानला 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा माल पाठवतो.' याचा अर्थ असा की बरेच व्यवसाय थेट होत नाहीत, तर चक्राकार पद्धतीने होत आहेत.
निर्यातदार नवीन पद्धती स्वीकारत आहेत

निर्यातदार नवीन पद्धती कशा स्वीकारत आहेत, यावर GTRI प्रकाश टाकला आहे. भारतीय कंपन्या त्यांचा माल या बंदरांवर पाठवतात. तिथे, दुसरी कंपनी त्या वस्तू घेते आणि एका बॉन्डेड वेयरहाउस साठवते. बाँडेड वेअरहाऊस म्हणजे अशी जागा किंवा गोदाम असते, जिथे वस्तू कर न भरता साठवता येतात. कारण, त्या अजूनही ट्रान्झिटमध्ये म्हणजे प्रवासात असल्याचे मानले जाते.
या बंधपत्रित गोदामांमध्ये, वस्तूंवरील लेबले आणि कागदपत्रे बदलली जातात. उदाहरणार्थ, भारतात बनवलेल्या वस्तूंना 'मेड इन यूएई' असे लेबल लावले जाते. त्यानंतर, हे सामान पाकिस्तानला पाठवले जाते, जिथे भारताशी थेट व्यापार करण्यास मनाई आहे.

हेही वाचा - आदिल.. IGNOU चा हुशार विद्यार्थी ते डोक्यावर 20 लाखांचे बक्षीस असलेला दहशतवादी

कंपन्या नजरेआड राहतात
अशाप्रकारे कंपन्या भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावरील बंदी टाळतात. ते त्यांचा माल थर्ड पार्टी चॅनेलद्वारे जास्त किमतीत विकतात आणि याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. कारण, असे दिसते की, हा व्यापार दुसऱ्या देशासोबत होत आहे.

उदाहरणार्थ, एक कंपनी भारतातून दुबईला 1 लाख डॉलर्स किमतीचे ऑटो पार्ट्स पाठवते. मग, लेबल बदलले जाते आणि ते UAE चे असल्याचे सांगितले जाते. यानंतर, हे सामान पाकिस्तानमध्ये 1 लाख 30 हजार डॉलर्समध्ये विकता येते. वाढलेल्या किमतीमध्ये साठवणूक, कागदपत्रे आणि एरवी बंद असलेल्या बाजारपेठेत प्रवेशाचा खर्च यांचा समावेश आहे.

ही पद्धत कायदेशीर आहे का?
जरी हे ट्रान्सशिपमेंट मॉडेल पूर्णपणे बेकायदेशीर नसले तरी, कायद्याच्या कक्षेत ते थोडे शंकास्पद आहे, असे अहवालात म्हटले आहे. कंपन्या व्यापार करत राहण्यासाठी नवीन मार्ग कसे शोधतात, हे यावरून समजते.


सम्बन्धित सामग्री