Friday, May 16, 2025 02:01:35 PM

पाकिस्तान म्हणतोय, अफगाण सीमेवर 54 दहशतवाद्यांना मारलं; कारवाई खरी की फक्त ढोंग?

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अफगाणिस्तान सीमेवरील उत्तर वझिरीस्तानमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडताना 54 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तान म्हणतोय अफगाण सीमेवर 54 दहशतवाद्यांना मारलं कारवाई खरी की फक्त ढोंग

इस्लामाबाद : पाकिस्तानी सुरक्षा दलांनी उत्तर वझिरीस्तानमध्ये 54 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे. आयएसपीआरने याला दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी चकमक म्हटले आहे. या चकमकीत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली, असे सांगण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानवर दहशतवाद पोसत असल्याबद्दल आणि दहशतवाद्यांना आसरा देत असल्याबद्दल जगभरातून मोठी टीका होत आहे. यात आपली खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तान दहशतवादविरोधी कारवाई करत असल्याचा आव आणत असल्याची पूर्ण शक्यता आहे.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अफगाणिस्तान सीमेवरील उत्तर वझिरीस्तानमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडताना 54 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेतील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये एकाच कारवाईत इतक्या मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले, असे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - 'या' आहेत पाकिस्तानी सैन्याच्या बहुचर्चित कमकुवत बाजू; तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह..

आयएसपीआरनुसार, 25, 26 आणि 27 एप्रिलच्या रात्री सुरक्षा दलांना हसन खेल परिसरात सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या हालचाली आढळल्या. सैनिकांनी जलद आणि अचूक कारवाई करून घुसखोरी उधळून लावली. आमच्या सैनिकांनी दहशतवाद्यांचे प्रयत्न प्रभावीपणे हाणून पाडले, असे लष्कराने म्हटले आहे. एका अचूक चकमकीत, सर्व 54 'खवारीज' नरकात पाठवण्यात आले. 'खवारीज' हा शब्द पाकिस्तान सरकारने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) साठी वापरला आहे. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली.

खरंच कारवाई केली की, ही फक्त बनवाबनवी?
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे तालिबान परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांनी काबूलमध्ये भारताचे विशेष दूत आनंद प्रकाश यांची भेट घेतली, ज्यामध्ये भारतासोबत आर्थिक आणि राजनैतिक संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. टीटीपी आणि सीमा संघर्षावरून तालिबान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असल्याने, या बैठकीला पाकिस्तानसाठी राजनैतिक धक्का म्हणून पाहिले जात आहे. पाकिस्तानने बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानवर टीटीपीला आश्रय देण्याचा आरोप केला आहे. मात्र, हा आरोप काबूलने फेटाळून लावला आहे.

हेही वाचा - पाकिस्तानी सैन्याचे मनोबल जमीनदोस्त! मुनीरच्या सैनिक आणि अधिकाऱ्यांसह 600 जणांचे राजीनामे?


सम्बन्धित सामग्री