नवी दिल्ली: सध्याच्या काळात स्मार्टफोन आणि इंटरनेट ही लोकांची गरज बनली आहे. आजच्या काळात इंटरनेट किंवा स्मार्टफोनच्या दुनियेपासून दूर असलेले लोक खूप कमी आहेत. दररोज कोट्यवधी लोक डेटा वापरत आहेत. त्याच वेळी, भारताने आता या बाबतीत आघाडी घेतली आहे. एका नवीन अहवालानुसार, सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या लोकांमध्ये भारतीयांचाचं समावेश आहे. या अर्थ असा की, भारतातील लोक सर्वाधिक डेटा वापरत आहेत.
हेही वाचा - EPFO कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ऑटो-सेटलमेंट मर्यादा वाढली; आता 'इतके' रुपये काढता येणार
5G वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ -
एरिक्सन मोबिलिटीच्या अहवालानुसार, भारतातील एक स्मार्टफोन दररोज 32 जीबी डेटा वापरत आहे. तथापी, 2030 पर्यंत हा आकडा 62 जीबी होऊ शकतो. डेटाच्या वाढत्या वापरासह, भारतात 5 जी नेटवर्कचाही वेगाने विस्तार होत आहे. तथापी, 2024 च्या अखेरीस, भारतात 5जी वापरकर्त्यांची संख्या 290 दशलक्ष होती, जी एकूण मोबाइल वापरकर्त्यांच्या 24 टक्के होती. तसेच असा अंदाज आहे की 2030 पर्यंत, भारतातील 5जी वापरकर्त्यांची संख्या तीन पटीने वाढू शकते, म्हणजेच 2030 पर्यंत 5जी वापरकर्त्यांची संख्या 980 दशलक्ष म्हणजेच 98 कोटी असू शकते.
हेही वाचा - आता Amazon घरपोच देणार 'ही' सेवा! वृद्धांना मोठा होणार फायदा
4G वापरकर्त्यांमध्ये घट -
दरम्यान, 5G वापरकर्त्यांमध्ये वाढ होत असताना आता 4 जी वापरकर्त्यांच्या संख्येत मात्र 60 टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक स्तरावर, फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस म्हणजेच FWA नवीन फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनपैकी 35 टक्क्यांहून अधिक असण्याची अपेक्षा आहे. तथापी, जगातील 5 जी सदस्यता 2025 च्या अखेरीस 2.9 अब्ज आणि 20230 पर्यंत 6.3 अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.