इस्लामाबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका असल्याचे शाहबाज शरीफ यांनी नाकारले आहे. त्यांनी म्हटले की भारताने कोणत्याही विश्वासार्ह तपास आणि पुराव्याशिवाय हे आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी असा दावा केला की, पाकिस्तान दहशतवादाने त्रस्त आहे आणि पाकिस्तानने दहशतवादविरोधी लढाईत मोठं नुकसान सहन केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे लोक त्यांची खिल्ली उडवू लागले आहेत.
भारताने सिंधू नदी पाणी करार थांबवल्याने पाकिस्तान अस्वस्थ होऊ लागला आहे. शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या मुद्द्यावरून भारतावर जोरदार टीका केली आणि पाण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची धमकी दिली. पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये बोलताना शाहबाज शरीफ यांनी सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानची जीवनरेखा असल्याचे म्हटले आहे. हे पाणी थांबवले तर त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले. या काळात, पाकिस्तानच्या मोठ-मोठ्या गप्पा ठोकणाऱ्या पंतप्रधानांनी असे काही म्हटले, ज्यासाठी त्यांची स्वतःचीच खिल्ली उडवली जात आहे.
हेही वाचा - नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरेल का? भारत-पाकिस्तान आणि तिसरे महायुद्ध याबद्दलच्या भाकितांची चर्चा!
शाहबाज यांच्या वक्तव्याची खिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका असल्याचे शाहबाज शरीफ वारंवार नाकारत आहेत. त्यांनी म्हटलंय की, भारताने कोणत्याही विश्वासार्ह तपास आणि पुराव्याशिवाय हे आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, भारताने आरोप-प्रत्यारोप थांबवावेत. यासोबतच, त्यांनी पाकिस्तान दहशतवादाचा सर्वात मोठा बळी असल्याचे म्हटले. शाहबाज शरीफ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी असेही म्हटले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगातील कोणत्या देशाचे 600 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे?
पाकिस्तानने एक निवेदन दिले
शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानला झालेल्या 600 अब्ज डॉलर्सच्या नुकसानाबद्दल गप्पा मारल्या. परंतु, वास्तव असे आहे की, पाकिस्तानचा एकूण जीडीपी फक्त 337 अब्ज डॉलर्स आहे. यामुळे शाहबाज यांच्या वक्तव्याचा अर्थ असा होत आहे की, पाकिस्तानला त्याच्या जीडीपीपेक्षा जास्त नुकसान होत आहे. आता या विधानामुळे शाहबाज शरीफ यांची खिल्ली उडवली जात आहे. X वरील एका वापरकर्त्याने विचारले की, त्यांना 'एक अब्ज'मध्ये किती शून्य असतात, हे माहीत आहे का?
शाहबाज यांनी पाकिस्तान दहशतवादाचा बळी असल्याचे सांगितले
त्याच कार्यक्रमात बोलताना शाहबाज शरीफ म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत 90,000 पाकिस्तानी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दहशतवादाविरुद्ध लढताना पाकिस्तानपेक्षा जास्त बलिदान कोणत्या देशाने दिले आहे? पाकिस्तानपेक्षा कोणत्या देशाचे आर्थिक नुकसान जास्त झाले आहे? यादरम्यान, शाहबाज शरीफ यांनी असेही म्हटले की, पाकिस्तान या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 'तटस्थ आणि पारदर्शक' चौकशीसाठी तयार आहे.
हेही वाचा - Pahalgam Terrorist Attack: मास्टरमाइंड सैफुल्लाहचा कांगावा अन् पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी
22 मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्याची जबाबदारी 'द रेझिस्टन्स फ्रंट' नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ही पाकिस्तानमधून चालणाऱ्या लष्कर-ए-तैयबाची एक आघाडीची संघटना आहे, जी काश्मीरमधील प्राणघातक हल्ल्यांसाठी जबाबदार आहे.